Nitesh Rane : राज्यात दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Death) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. खरा खुनी आहे जो काल विधानसभा परिसरात दिसला त्याच्यावर लवकर कारवाई होईल”, असे म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षरीत्या आरोप केला आहे.
देशभर गाजत असलेल्या बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत राज्य सरकार आजच SIT ची घोषणा करु शकते. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “काल खरा खुनी आपल्या वडिलांसोबत आला होता. सर्वांची उत्तरं या निमिताने बाहेर येणार आहेत. मी देखील थांबलोय. एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरा समोर बोलवा.”असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला, त्यांनी,”आदित्य ठाकरेला पोहोचवा असेच संजय राऊतला वाटतंय. अडीच वर्षे त्यांचे सरकार होते तेव्हा हे काय गोट्या खेळत होते. अनिल परब यांनी स्वतः म्हणाले 13 जूनला पार्टी होती. त्यांना देखील एसआयटी चौकशीत बोलवावे. दोन वेळा क्लोजर रिपोर्ट बदलला आहे. आयोगाला अनिल परब याचे मालवणीत फोन येत होते की साक्ष बदला, “असा खळबळजनक आरोप देखील नितेश राणे यांनी केला.
संजय राऊत मागास वर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का? राज्य सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. संजय राऊतसारखे खिचडी चोर छगन भुजबळ नाहीत. संजय राऊत तुझी केस वेगळी आहे भुजबळ यांची वेगळी आहे, असे नितेश राणे म्हणाले. तसेच “तुझ्या मालकाचे सरकार होते तेव्हा नागपूर, ठाणे महापालिकेत चौकशी का लावली नाही? खिचडी खाल्ली, मातोश्री चालवली ना? मग आता जा चौकशीला सामोरे, “असेही नितेश राणे म्हणाले.