अलिबाग (प्रतिनिधी) – अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असणारे निसर्ग तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी दिड वाजण्याच्यासुमारास किनारपट्टीला धडकले, यावेळी ताशी 110 ते 120 किलोमीटर चक्राकार वारे वाहून मुसळधार पाऊस परिसरात पडत आहे. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. किनारपट्टी लगत वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून पडली. जमीनीवर येताच या वादळाचा वेग कमी होत जाणार आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतची गावे सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे अलिबाग किनारपट्टी वर धडकल्यानंतर हे वादळ आता मुबंईच्या दिशेने सरकत आहे आगामी तीन तासात हे मुंबई पर्यत पोहचेले. सध्या मुंबईवर चक्रीवादळाचा प्रभाव सुरू झाला आहे. यठिकाणी वाऱ्याचा वेग हा 90 किलोमीटर इतका आहे. पुढील तीन ते चार तास हे मुंबईकरांसाठी आव्हानात्मक असणार आहेत.
The rear part of the wall cloud region is still over the sea and the landfall process will be completed in one hour. Its current intensity near the centre is 90-100 kmph to 110kmph. It will move northeastwards and weaken into a cyclonic storm during next 6 hrs:IMD#CycloneNisarga pic.twitter.com/szSTwVb40N
— ANI (@ANI) June 3, 2020