न्हावरे – येथील परिसरात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे न्हावरे पोलिसांनी 30 व्यक्तींवर कारवाई केली आहे. प्रामुख्याने दुचाकीवर फिरणाऱ्यांकडून त्यांच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. तर काही दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्यात आला आहे.
संचारबंदीचे उल्लंघन केलेल्यांमध्ये विनाकारण भटकणारे युवक व दारूच्या शोधत फिरणारे तळीराम यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथून पुढे विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच एकापेक्षा अधिक जण दुचाकीवर आढळून आल्यास किंवा गाडीवर मास्कचा वापर करीत नसल्यास सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे, असे न्हावरे दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी सांगितले.