मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. तर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील संघाचं नेतृत्व बदलण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय संघातील विराट कोहली-रवी शास्त्री जोडी तूटली. आता रवी शास्त्री यांनी संघाच्या प्रशिक्षक बदलावरून भारतीय क्रिकेटन नियामक मंडळावर टीकास्त्र सोडलं.
शास्त्री म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) काही लोकांना आपण प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते. बीसीसीआयमधील काही लोकांनी तसे प्रयत्न केले होते, जेणेकरून मला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळू नये’.
दरम्यान रवी शास्त्री यांच्यापूर्वी अनिल कुंबळे यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होतं. त्यावेळी रवी शास्त्रीही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. मात्र अनिल कुंबळेला प्राधान्य देण्यात आलं होतं.
मात्र विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर कुंबळे यांनी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोन दिवसांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शास्त्री यांच्याकडे प्रशिक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावर शास्त्री म्हणाले की, माझ्याऐवजी दुसऱ्याची निवड केली. मात्र 9 महिन्यांना त्यांना माझ्याकडेच यावं लागलं. ही बाब संबंधितांसाठी लाजिरवाणी होती, असंही शास्त्री यांनी नमूद केलं.