नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका विधानावरून कॉंग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले आहे. जून नंतर भारताला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असे विधान नारायण राणे यांनी काल केले आहे.
त्याचा दाखला देत रमेश यांनी म्हटले आहे की ही वस्तुस्थिती मोदी आणि अर्थमंत्री लपवत आहेत काय याचा खुलासा झाला पाहिजे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले की, मी मंत्रिमंडळात असल्यामुळे आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे आणि आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडून जे काही सल्ले मिळतात, त्या आधारे आम्ही असे म्हणू शकतो की मोठ्या देशांमध्ये आर्थिक मंदी आहे. हे वास्तव आहे.आणि भारताला जूननंतर याचा फटका बसू शकतो.