मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की,’राष्ट्रवादी राज्यात जातीचे राजकारण करते आहे. मनसेला त्यांचा कडून काहीच शिकायची गरज नाही.’
नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच.महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 21, 2021
‘नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच.महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच. तसेच राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.’ असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली आहे.
दरम्यान, मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत; परंतु जातीयवाद विषयावर मी जे मत मांडले त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकाशी काय संबंध, हे मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावून सांगावे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच पवार यांच्या टीकेला उत्तर देत पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर टीका केली.