लाखणगाव – गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत पावसामुळे गारठा, तर मध्येच गरम होत असल्याने लाखणगाव परिसरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
आरोग्याच्या या समस्येमुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत औषधोपचार घ्यावेत, तसेच सध्याच्या परिस्थितीत पाणीही उकळून आणि गाळून प्यावे, असेही आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी कचऱ्याचे नियोजनही योग्य पद्धतीने करावे, त्यामुळे रोगराईस अटकावर होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.