मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ल्याबोल केला आहे. नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे. नवनीत राणा म्हणाले,’उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. हनुमान चालिसासाठी आम्हाला आत टाकलं. महिलांना तुरुंगात टाकणारं हे सरकार आहे. माझ्यावर जो अन्याय केला.’असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा म्हणाला,’मला आतापर्यंत जो त्रास त्रास दिला गेला. तो त्रास मला आताही होत आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्या दिवशी रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकलं तर त्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांना विचारेन आता कसं वाटतंय. वेदना काय असते. तुरुंग काय असतो आणि तुरुंगातील एक एक मिनिट किती वेदनादायी असतो असेही मी मुख्यमंत्र्यांना विचारेल.’
त्या पुढे म्हणाल्या,’कोणताही गुन्हा नसताना आपल्याला १२ दिवस तुरुंगात डांबले. आदित्य ठाकरे यांना अशाच प्रकारे तुरुंगात टाकण्यात येईल, तेव्हाच त्याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होईल.’ अशा शब्दात खासदार राणा यांनी संताप व्यक्त केला.