मुंबई – कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ही १६८ वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० मार्च २०२० पासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डबेवाल्यांनी घेतला आहे. मुंबई डब्बेवाला असोसिएशन कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहे. याशिवास खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या आदेश देखील राज्य शासनाने दिला आहे.
Maharashtra: Mumbai’s ‘Dabbawalas’ to suspend their services from 20th March till 31st March, in wake of #CoronavirusPandemic; Visuals from today morning. pic.twitter.com/EoJN5Ek3Fc
— ANI (@ANI) March 19, 2020
दरम्यान, मुंबईतील नोकरदरांना जेवणाचे डब्बे घरापासून त्याच्या ऑफिसपर्यंत नेण्याचे काम मुंबईचे डब्बेवाले करत असतात. मात्र आता करोनाच्या पार्श्वभूमीवर १३० वर्षांतून पहिल्यांदाच डब्बेवाल्यांची सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.