मुंबई : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिकार्याखाली दाबले गेले आहेत. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केले.
इमारतीच्या ढिगार्याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सहाही जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्याची मोहीम अग्निशमाक दलाच्या जवानांनी हाती घेतली. यामध्ये चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला 40 ते 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने या इमारतीला दोन वेळा नोटीसा देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्याने दिली आहे. शिवाय या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. इमारत धोकादायक असताना देखील या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम महानगरपालिकेचे होते, परंतू महानगरपालिकेने फक्त नोटिसा बजावून आपले हात झटकले होते. खरंतर महानगरपालिकेने योग्य वेळी जर ही इमारत खाली केली असती तर आज या इमारत दुर्घटनेत दोघांचा बळी गेला नसता.