Mumbai Indians, IPL 2024 :- मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. त्यांनी आपले पहिले दोन्ही सामने गमावले असून ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईला अजून संपूर्ण मोसमाला सामोरे जायचे आहे. आता संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र येत आपली कामगिरी उंचावतो का हे पहावे लागेल.
मुंबई इंडियन्सचा सनराईजर्स हैदराबादने ३१ धावांनी पराभव केला. हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी २७७ ही धावसंख्या उभारली होती. त्यानंतर मुंबईनेही जोरदार प्रयत्न करत २४६ धाावांपर्यंत मजल मारली. मात्र हैदराबादचे लक्ष्य मुंबईच्या आवाक्याबाहेर राहिले. मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मैदानावर मुंबईच्या गोलंदाजींनी २७७ धावांची खैरात वाटली. मैदानाबाहेर बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडले आहे. टीम रोहित शर्मा #RohitSharma आणि टीम #HardikPandya हार्दिक पंड्या.
रोहित शर्मा हा हार्दिक पंड्याकडे नेतृत्व दिल्याने नाराज आहे. रोहित हा सध्या भारतीय संघाचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे तो फार खुश झालेला नाही. संघात असंतोष असून त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले आहेत.
जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि इतर खेळाडू हे रोहित शर्माच्या गटात आहेत. तर इशान किशन आणि इतर काही खेळाडू हे हार्दिक पंड्याला समर्थन देत आहेत. संघात दुफळी निर्माण झाल्याने संघाच्या एकसंधतेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संघाची कामगिरी देखील प्रभावित होत आहे.
BWF Rankings : सात्विक-चिरागने पुन्हा एकदा रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारे ठरले पहिलेच भारतीय…
मैदानावरही पंड्या लक्ष्य
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चाहत्यांना नाकारला असून अहमदाबादमधील चाहत्यांनी पांड्याचे हुटिंगने स्वागत केलं. पांड्याने अहमदाबाद फ्रेंचायजी सोडण्याचा राग चाहत्यांनी व्यक्त केला हे समजू शकतो.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
मात्र हैदराबादविरूद्धच्या सामन्यात देखील हार्दिक पंड्याला अशाच प्रकारच्या हुटिंगचा सामना करावा लागला होता. त्यात भरीस भर म्हणून सामना हरल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. ट्रोलिंग करताना सभ्यतेची पातळी काही ठिकाणी ओलांडली गेली. पंड्याबद्दलचा राग आयपीएल जसजसे पुढे सरकत आहे तसतसे अधिक वाढत आहे.