पुणे – श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर 1 लढतीत रत्नागिरी जेट्स संघाने कोल्हापूर टस्कर्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धीरज फटांगरेने 26 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यात 6चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. प्रीतम पाटील पाठोपाठ कर्णधार अझीम काझी बाद झाला.
रत्नागिरीची 6 षटकात 3 बाद 44 अशी धावसंख्या असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. पावसाच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघातील सामना प्रत्येकी 15 षटकांचा करण्यात आला.
रत्नागिरीच्या किरण चोरमलेने 22 चेंडूत 1चौकार व 3 षटकारासह 34 धावा चोपल्या. धीरज व किरण या जोडीने चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून धावगती वाढवली. किरण चोरमले व धीरज फटांगरे बाद झाल्यावर निखिल नाईक, साहिल चुरी, रोहित पाटील यांनीही निराशा केली. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 25 धावांची खेळी करत संघाला 15 षटकात 8बाद 136 धावांचे आव्हान उभे करून दिले. पण पावसाच्या व्यत्ययामुळे कोल्हापूर संघाला 15 षटकात 135 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
135 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला कोल्हापूर टस्कर्स संघ 1.5 षटकात बिनबाद 18 धावा असताना पाऊस सुरु झाला. यात केदार जाधव नाबाद 9 व अंकित बावणे नाबाद 8 धावांवर खेळत होता. केदार जाधवने 55 धावांची खेळी केली. अंकित बावणेने 18 धावा केल्या. त्यानंतर केदार जाधवने साहिल औताडेच्या साथीत विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, रत्नागिरीच्या विजय पावले व अझीम काझी यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक :-
रत्नागिरी जेट्स : 15 षटकात 8 बाद 136 धावा. (धीरज फटांगरे 46, किरण चोरमले 34, दिव्यांग हिंगणेकर नाबाद 25, निखिल नाईक 11, आत्मन पोरे 2-23, मनोज यादव 2-25, निहाल तुसमद 1-22) वि. वि. कोल्हापूर टस्कर्स : 15 षटकात 5 बाद 130 धावा. (केदार जाधव 55, साहिल औताडे 20, अंकित बावणे 18, सिद्धार्थ म्हात्रे 13, तरणजित ढिलोन नाबाद 10, विजय पावले 2-22).