मुंबई (प्रतिनिधी) – प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकछयऱ्या देण्याच्या खोट्या घोषणा करणारे, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
कॉंग्रेसच्या 135व्या स्थापना दिनानिमित्त जिथे कॉंग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्या ऐतिहासिक गोकुळदास तेजपाल हॉल येथे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात “भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिक या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले होते. विल्सन कॉलेजजवळ या फ्लॅग मार्चचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहीक वाचन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खर्गे यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली, ते म्हणाले की, मुंबई शहरातून कॉंग्रेसची स्थापना झाली. 1942 च्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात याच मुंबईतून झाली. कॉंग्रेसने संघर्ष करून देशाला स्वातंत्रय मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार झाले. कॉंग्रेस सरकारांनी या संविधानाच्या मार्गाने चालून देशात लोकशाही रूजवली व वाढवली. संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाछयावर चालणाछया भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी व एनपीआर ही त्या प्रक्रियेचा भाग आहेत. संविधानाला पायदळी तुडवून देशात धार्मिक फूट पाडण्याचा व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न मोदी शाह करत आहेत. त्यांना चले जावो सांगण्यासाठीच भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढला आहे, असे खर्गे म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर कॉंग्रेसने सर्व जाती धर्माच्या गरिब श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्रय मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी, न्याय व व्यक्तीस्वातंत्रय दिले. संविधानाने जनतेला दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न भाजपचे केंद्र सरकार करत आहे. पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच मोदी शाह यांच्या हुकुमशाहीतून देशाला मुक्त करण्यासाठी कॉंग्रेसने नवस्वातंत्रय लढा उभारला आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.