राहुल यांनी माफी मागण्यास दिला नकार
म्हणाले मी या लोकांची कदापिही माफी मागणार नाही
नवी दिल्ली : भारतात सध्या मेक ईन इंडिया नव्हे तर रेप ईन इंडियाची स्थिती आहे असे विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्यावरून लोकसभेत आज भाजपच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेत राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी केली होती. तथापी राहुल गांधी यांनी आज त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना देशाला अनेक आघाड्यावर खड्ड्यात घालणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनीच देशाची माफी मागितली पाहिजे अशी भूमिका घेतली, मी या लोकांची कदापिही माफी मागणार नाही.
र्आज लोकसभेत भाजपच्या लोकांनी जो आक्षेप घेतला त्याला मला प्रत्युत्तर देण्याची संधी देण्यात आली नाही असे नमूद करून ते म्हणाले की दिल्लीतील बलात्कारांच्या घटनांच्यावेळी दिल्ली हे बलात्काऱ्यांची राजधानी झाली आहे असे विधान मोदींनी केले होते. त्यांच्या या विधानाची क्लिप माझ्या मोबाईल मध्ये आहे ती मी ट्विटरवर टाकणार आहे असे ते म्हणाले. मोदींनी ईशान्य भारत आगीत ढकलला, देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, या विषयावरून लोकांचे आणि देशाचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी ते आज माझ्या विरोधात हा आरडाओरडा करीत आहेत असे ते म्हणाले.
आपल्या विधानाचा पुनरूच्चार करीत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा खुूलासाही केला. ते म्हणाले की मोदी मेक ईन इंडियाच्या घोषणा करतात. वृत्तपत्रात मेक ईन इंडियाची जाहीरात असेल असे समजून आम्ही जेव्हा वर्तमान पत्रे उघडतो त्यावेळी त्यात देशातील बलात्काराच्याच बातम्या येतात. तुम्हाला रेप ईन इंडीया असेच वाचयला मिळते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. उत्तप्रदेशात बलात्काराच्या अनेक गंभीर घटना अलिकडच्या काळात घडल्या. त्यावर मोदी एक शब्दही बोलले नाही. उन्नाव मध्ये भाजपच्या आमदाराने एका युवतीवर बलात्कार केला त्यावरही मोदी एक शब्दही बोलेले नाहीत. महिलांवरील अत्याचार, ईशान्य भारतातील हिंसक प्रकार, काश्मीरातील हिंसाचार त्यावर ते एक शब्दही बोलत नाहीत याकडेही राहुल गांधी यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
देशातल्या अर्थव्यवस्थेच्या संबंधात आपली रघुराम राजन यांच्याशीही चर्चा झाली. त्यावेळी भारताच्या एकूणच अर्थिक स्थितीबाबत विदेशातील नागरीकांमध्ये चिंतेची स्थिती आहे अशी माहितीही त्यांनी आपल्याला दिल्याचे ते म्हणाले. आपली आर्थिक क्षमता हीच आपली क्षमता होती. पण आज युरोप आणि अमेरिकेत भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी साफ दुर्लक्ष केले जात आहे असेही ते म्हणाले.