रांची : छत्तिसगढमध्ये सुरक्षा दलांच्या 16 जवानांची नक्षलवाद्यांनी हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. सुकुमा जिल्लह्यातील मिनपा जंगलात शनिवारी ही चकमक उडाली होती.
चकमकीनंतर पोलिसांनी सुमारे डझनभर जवान बेपत्ता असल्याचे म्हटले होते. ते 14 जवान जखमी झाले होते. त्यांना सुकमा येथून 400 किमीवरील रायपूर येथील रुग्णालयात हकलवण्यात आले. जंगलातून आतापर्यंत 17 जवानांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती छत्तीसगढचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले.
सुरक्षा दलांच्या 10 एके 47 सह 15 स्वयंचलीत बंदुका बेपत्ता आहेत. त्या नक्षलवाद्यांनी पळवल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शनिवारी पहाटे एक वाजता ही चकमक सुरू झाली. कोरजगुडा जंगलात चिंतागुफा जवळ ही चकमक उडाली. सरक्षा दलाचे जवान माओवादी विरोधी मोहीम राबवत असताना हा हल्ला झाला, असे अवस्थी यांनी स्पष्ट केले.
ही चकमक सायंकाळपर्यमत सुरू होती. दोन्ही बाजून जोरदार गोळीबार सुरू होता. सुरक्षा दले माघारी आल्यानंतर त्यात 17 जवान बेपत्ता असल्याचे आढळले. तर 14 जण जखमी असल्याचे आढळले, असे अवस्थी यांनी सांगितले.
पोलिसांच्या जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल आणि कोब्रा गट यांनी ही मोहीम राबवली होती. त्यात 150 कर्मचारी सहभागी झाले होते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी मोठ्या संख्येने फौजफाटा पाठवण्यात आला. नक्षलवाद्यांच्या बटालीयन क्रमांक एक बरोबर ही चकमक उडाली. या बटालीयनचा म्होरक्या मांडवी हिदमा होता.
सुमारे एक डझन माओवाद्यांना गोळ्या लागल्या आहेत. मात्र त्यांचा एकही मृतदेह आढळला नाही. नक्षलवादी संख्येने सुमारे तीनशे होते. अन्य राज्यातले नक्षलवादीही मिनपा जवळ एकत्र आले होते अशी माहिती मिळत आहे, असे अवस्थी यांनी सांगितले.