Amit Shah : देशात भाजपचे सरकार आल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशहतवादी कारवायांमध्ये घट आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. संसदेत याच मुद्द्यावर बोलताना अमित शाह यांनी सरकारने विशेष रणनीती आखली असून त्यामुळे देशात दहशहतवादी घटना कमी झाल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर काय केलं जात ? असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जातो त्याविषयी देखील त्यांनी उत्तर दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलताना जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याबद्दल आणि त्यामागे सरकारची नेमकी रणनीती काय? हे सांगितलं. ते म्हणाले की, “हे पूर्वीसारखं सरकार नाही. आता जिथे जिथे दहशतवाद्यांना ठार केलं जातं, तिथेच त्यांना धार्मिक पद्धतीने दफन केले जाते. तसेच, त्यासोबतच गृहमंत्री म्हणाले की, आता केंद्रशासित प्रदेशांचे सेवा नियमही बदलले आहेत. दहशतवादी घटनांमध्ये कोणताही सरकारी अधिकारी किंवा त्याचं कुटुंब सहभागी असल्यास कारवाई होते आणि त्याला नोकरी गमवावी लागते” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
Big Breaking .
Body of terrorist killed in encounter will be buried at the site.
No job for anyone against whom any case of stone-pelting in registered.
Amit Shah on transforming Kashmir, J&K .
Comment and retweet it .pic.twitter.com/ChUQuqmhTH
— Aquib Mir (@aquibmir71) December 16, 2023
पुढे बोलताना अमित शाह यांनी, “या नियमांमुळे जे लोक येथे सरकारी नोकऱ्या करत होते आणि त्यांचे नातेवाईक पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात मदत झाली आहे. त्यासोबतच पुढे त्यांनी, ज्यांचे रेकॉर्ड संशयास्पद आढळतात त्यांना पासपोर्ट दिले जात नाहीत. नोकरीच्या संधी नाहीत आणि कंत्राटेही दिली जात नाहीत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी ही आमची रणनीती आहे आणि त्याचा परिणाम म्हणजेच, जम्मू-काश्मीरमधी दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनाही कमी झाल्याचे अमित शाह म्हणाले.
त्यासोबतच, “2014 पूर्वी तुम्ही पाहत असाल की, काश्मीरमध्ये जेव्हा-जेव्हा एखादा दहशतवादी मारला जायचा, तेव्हा त्याच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी जमायची. पण आता पूर्वीचं सरकार नाही, आता जिथे जिथे दहशतवाद्यांना ठार मारलं जातं, तिथे तिथे त्यांचे मृतदेह दफन केले जातात. यामुळे दहशतवाद्यांसाठी रॅली काढण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. कलम 370 हटवल्यानंतर तुम्हाला अशी कोणतीही घटना दिसली का? असा सवाल त्यांनी केला. दगडफेकीच्या घटना कशा कमी झाल्या? असं तुम्हाला वाटतं, असा सवालही त्यांनी केला.