Manoj Jarange : राज्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आदोलनानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. त्यातच आज मनोज जरांगे पाटील अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहे. त्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या मागणीसाठी सरकारला (Maharashtra Government) दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘राज्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) दिलेला शब्द पाळणारे असून ही प्रतिमा महाराष्ट्रातल्या घराघरात आहे. त्यामुळे आजच्या चांगल्या दिवशी मराठा आरक्षणाचा निर्णय ते घेतील अशी अपेक्षा आहे. पदाला किंमत देण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यावा, शब्दाला जागणारे तुम्ही आहात, मात्र आजच्या दिवसांनंतर एक तास सुद्धा मिळणार नाही, उद्यापासून हा विषय संपला’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांना राज्य सरकारने दिलेला चाळीस दिवसांचा वेळ आज संपणार आहे. शेवटचे काही तास शिल्लक असून दरम्यानच्या काळात सरकारकडून जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क सरकारने केलेला नाही. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे अहमदनगरला रवाना झाले. या ठिकाणी ते धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवाना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.
अहमदनगरच्या (Ahmednagar) चौंडी येथे दसऱ्याच्या दिवशी यशवंत सेनेकडून धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) देखील उपस्थित राहणार असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देणार आहेत आणि एकमेकांचे लहान मोठे भाऊ आहोत आणि एकमेकांच्या मदतीला गेलंच पाहिजे, असे सांगत चौंडी येथील यशवंत सेनेच्या धनगर आरक्षण मेळाव्याला आपण जात असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक कार्यक्रम असून धनगर बांधवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुढे जाणार असल्याचे देखील ते म्हणाले.