Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारकडे आपल्या 13 मागण्या करतानाच निर्णायक इशारा दिला होता. मात्र, वाशीमधील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे घेत अखेर जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची वाशीत जाऊन भेट घेतली. त्यासोबतच मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगेंचे वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत करण्यात आले. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी जल्लोष केला आहे.
यावेळी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना विजयाचा गुलाल लावला आहे. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आल्याने मराठा आंदोलक नवी मुंबईत जल्लोष करत आहेत.नोंदी सापडणाऱ्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली.सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. मराठ्यांचा विजय झाल्याने राज्यभरात जल्लोषमय वातावरण आहे. मागील सात महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर आज यश मिळाले आहे.