maratha reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा केली ते पुढे म्हणाले,‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो. असेही शिंदे यावेळी म्हणाले आहे.
शिंदे पुढे म्हणाले,’मराठा समाजाचा हा संघर्ष असून आतापर्यंत मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं. या समाजामुळे अनेकांना मोठंमोठी पदं मिळाली. मात्र मराठा समाजाला न्याय देताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी देणे आवश्यक होते. मात्र आज दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केल की,’मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर कायद्याच्या चौकटीत टिकणारं, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असं मराठा आरक्षण ज्या ओबीसींना सवलती मिळतात, त्या सवलती मराठ्यांना दिल्या जातील, असेही ते म्हणाले आहे.
मनोज जरांगे यांची भेट..
🗓️ 27-01-2024📍वाशी https://t.co/ykt1SLNV3H
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024
वाशीत यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलकांशी बोलतांना म्हणाले,’जेव्हा आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील, असं बोललं जात होतं.’ यानंतर मनोज जरांगे आंदोलकांशी बोलतांना म्हणाले,’जेव्हा आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील मात्र आम्ही आरक्षण घेणारच असं ठरवून घरून निघालो होतो.
ते पुढे म्हणाले,’आम्ही २९ ऑगस्टला म्हटलं होतं, आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार…ज्यांनी पाचर मारलीय ती काढून फेकणार…मराठ्यांचा नादी लागायचं नाही. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाईलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. यापुढेही होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान-मोठे भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो.’ असेही ते म्हणाले आहे.