हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत…
मकरंद आबांच्या रॅलीत कट्टर विर
गेली अनेक वर्षांपासून मदनदादा भोसले यांचे खंदे समर्थक व उदयनराजे भोसले यांचे सर्वात विश्वारसू सहकारी अशी ओळख विकास शिंदे यांची आहे. गत निवडणुकी दरम्यान मकरंद पाटील व त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर या दोघांच्यात प्रचंड वितुष्ट आले होते. मात्र आज मकरंद आबांच्या रॅलीत विकास शिंदे यांनी एंट्री करून त्यांना पुष्पहार घालत आबांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
वाई – विराट शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सुमारे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तरुणांची संख्या लक्षणीय होती. “कोण आला रे कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला’ या घोषणेने संपूर्ण वाई शहर दणाणून गेले. महागणपतीची आरती करून नव्या पुलावरून भव्य रॅलीने आ. पाटील नूतन प्रशासकीय इमारत येथे दाखल झाले.
भाजी मंडई येथे झालेल्या जाहीरसभेत बोलताना आ. पाटील म्हणाले, सलग दहा वर्षे या मतदारसंघातील मतदारांनी मोठे मताधिक्य देत मला विजयी करून माझ्यावर विश्वास दाखवला. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या भूमीत माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. इथले संस्कार आणि विचारांवरच माझी जडणघडण झाली. स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांनी जवळपास 60 वर्षे या जिल्ह्याचे नेतृत्व केले. एक लढवय्या नेता अशी त्यांची ओळख होती. स्व. मदनराव पिसाळ आप्पा यांनाही या मतदारसंघात सलग वीस वर्षे समाजसेवा करण्याची संधी मिळाली. आप्पा आणि तात्यांचा तोच वारसा जपत मी कार्यरत आहे.
यावेळी सभेला जिल्हाध्यक्ष सुनिल माने, बाळासाहेब सोळसकर व राष्ट्रवादीचे तिन्ही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, सभापती, उपसभापती, नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका विमलताई पार्टे तसेच भाजपचे नेते सज्जाद वारुणकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर झोपडपट्टी सुरक्षा दलाने आ. पाटील यांना पाठिंबा दिला. सूत्रसंचालन अनिल सावंत यांनी तर आभार शशिकांत पवार यांनी मानले.
यावेळी प्रताप पवार, बाळासाहेब भिलारे, शशिकांत पिसाळ या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी आम्ही काल, आज आणि उद्याही मकरंद आबांच्या पाठीशी असल्याचे सांगत तिन्ही तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही दिली. आपल्या भाषणात तिघांनीही उदयनराजे भोसले यांच्यावर कडाडून टीका केली.
श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी…
आ. मकरंद पाटील यांच्या जाहिरसभेवेळी लोकसभेचे उमदेवार श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ग्रामीण बोली भाषेतील उदाहरणे देत त्यांनी संपूर्ण सभेचा ताबा घेतला. विरोधी उमेदवाराचे आव्हान स्वीकारले असून कुस्ती मारणारच असे ते म्हणाले. ज्याने प्रजा सोडली त्याला आता प्रजा सोडणार नाही. माझ्यावर अशी टीका केली जाते की, यांना चालता येत नाही, बोलता येत नाही पण पुढचा कसा चालतो हे जनता जाणते. त्याला बोलता तरी येते का? असे सांगताच एकच हशा पिकला.