नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा मुद्दा काँग्रेसने संसदेत उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस नेते संसदेच्या बाहेर भाजपविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल, आनंद शर्मा आणि रंजन चौधरी यांच्यासमवेत अनेक बडे नेते उपस्थित आहेत.
यावेळी काँग्रेस नेत्यांच्या हातात भाजपविरोधात पोस्टर्स असून त्यावर लोकशाहीची हत्या बंद करा, अबकी बार बेईमानीची सरकार नाही चालणार, असे लिहिण्यात आले आहेत.
Delhi: Congress Interim President Sonia Gandhi leads party’s protest in Parliament premises over Maharashtra government formation issue. pic.twitter.com/B98L3uHqq0
— ANI (@ANI) November 25, 2019
दरम्यान, भाजप आणि अजित पवार यांनी राज्यघटनेची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा. विश्वासदर्शक ठरावावेळी सत्य सर्वांच्या समोर येईलच, असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.