मुंबई – बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी चाळीतल्या, सर्व सामान्य पोरांना मंत्री बनवलंय आहे… महाराष्ट्रात दोनच विठ्ठल आहेत… एक म्हणजे बाळासाहेब आणि दुसरे शरद पवार, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते.
‘मी कार्यक्रमाला येताना खूप बॅनर पाहिले… त्यावर भीष्म पितामह असं लिहिलं होतं… मला वाटतं यात काही गैर नाही… मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय आहे,’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते.