मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा काल (दि. 26) पासून सुरुवात झाली आहे. राज्यातील गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. मात्र, शिवभोजनवरून मनसेने टीका केली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांचा एक फोटो ट्विट करत लिहले कि, 10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!, अशी टीका केली आहे.
१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ? pic.twitter.com/kmuCGq3PfX
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 27, 2020
दरम्यान, शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 11,274 थाळींची विक्री झाली आहे. तर सर्वाधिक विक्री ठाणे आणि नाशिक या भागांमध्ये झाली आहे. सध्या राज्यात 125 केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम एक वाटी वरण समाविष्ट करण्यात आले आहे.