प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील कडता या गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे विजेची तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान त्यासाठी चरण्यासाठी आलेल्या गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
सागर जिले के ग्राम कड़ता में बिजली के तार टूटने से करंट से 20 गायों की मृत्यु की घटना बेहद दुखद।
नियमानुसार मृत गायों के मालिकों को आर्थिक सहायता प्रदान करने के निर्देश।
इस मामले की जाँच भी करवायी जायेगी। यदि किसी की लापरवाही या दोष सामने आया तो उस पर भी कड़ी कार्यवाही होगी।— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) August 25, 2019
‘सागर जिल्ह्यातील कडता गावामध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे. गायींच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल’ असे ट्विट कमलनाथ यांनी केले आहे. मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी गायींचा कळप हा गावाबाहेर असलेल्या परिसरात चरण्यासाठी गेला होता. मुसळधार पावसामुळे विजेचा प्रवाह असलेली एक तार जमिनीवर पडली होती. त्याच दरम्यान विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाला आहे.