औरंगाबाद (बिहार) – बिहारच्या औरंगाबादमध्ये शुक्रवारी सहा मैत्रिणींनी एकत्र विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तीन किशोरवयीन मुलींचा मृत्यू झाला असून अन्य तीन मुली मात्र अत्यवस्थ आहेत. मुलींना गावकऱ्यांनी मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.
मुलींना विषारी द्रव्य कुठून मिळाले आणि एवढे कठोर पाऊल उचलण्यामागील कारण काय याची चौकशी सध्या पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे आसपासच्या भागात मोठीच खळबळ उडाली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सर्व मैत्रिणी एकत्रितपणे गावाबाहेरच्या तलावाकडे केल्या आणि त्यांनी तेथे एकत्रपणे शेतात विष प्राशन केले.
काही वेळाने काही ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या सर्व मुलींना मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण दरम्यानच्या काळात तीन मुलींचा त्यात मृत्यू झाला. सहाही मैत्रिणी बिहारच्या औरंगाबादमधील चिरैला गावातील रहिवासी असून त्या 12 ते 16 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचा अँगल असल्याची गावच्या सरपंचांची शंका आहे. पण एका मुलीच्या प्रेमप्रकरणासाठी सहा मुली एकदम कशा आत्महत्या करतील असा प्रश्न अन्य गावकरी विचारत आहे. त्यामुळे वरीष्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.