Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. महायुतीकडून सर्वात पहिले भाजप पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.राज्यात महायुती सरकार आहे, अशात जागावाटपानंतर शिंदे गट, अजित पवार गट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलतांना दिसत आहे.
शिंदे गटातील आमदार खासदार जागावाटपावरून नाराज असून काही मतदार संघात यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात नुकतीच शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Eknath Shinde । नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील
‘मागच्या लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल होतं त्यानंतर विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते. सध्या आम्ही नवरदेववाले आहोत. ते नवरीवाले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हा नवरदेववाला समजून मदत करावी, हीच अपेक्षा आहे’ असे म्हणत भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
ते पुढे म्हणाले,’मागच्या काळात आम्ही मोदीजींचं काम केलं होतं. 1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार आम्ही निवडून दिला आहे. यावेळी सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नाही. आम्ही नवरदेव वाले आहोत ते नवरीवाले आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. तर मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या पुढच्या काळात घडणार नाही.’ असेही पाटील म्हणाले.
हे वाचलं का ? मोठी खेळी…! वसंत मोरे यांची मराठा समाजाच्या बैठकीत हजेरी म्हणाले,’..तर पुण्यातून १०० टक्के खासदार होणार’