Lok Sabha Elections। लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागलाय. भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशीच लोकसभेची रंगत पाहायला मिळत आहे. भाजपसोबत एनडीए आघाडीतील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या मैदानातआपली ताकद पणाला लावलीय. तर दुसरीकडे काँग्रेसही आपले शिलेदार रिंगणात उतरवलेत.
देशात पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. हे मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे. तसेच या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. त्याआधी कोणता पक्ष बाजी मारणार याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काही सर्वे देखील करण्यात येत आहेत. असाच एक सर्वे समोर आला आहे. ज्यामध्ये देशातील कोणता पक्ष भविष्यात जनतेचे प्रश्न सोडवू शकेल याची माहिती देण्यात आलीय.
कोणता पक्ष जनतेचे प्रश्न सोडवणार ? Lok Sabha Elections।
सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात चांद्रयान-3 चंद्रावर उतरवलं. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे, जागतिक स्तरावर भारताची ताकद, आर्थिक आणि देशांतर्गत देशाची ताकद वाढवणे, या गोष्टी घडल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडी बेरोजगारी, महागाई आणि अल्पसंख्याक आणि दलितांवरील भेदभाव आणि देशातील सत्ताधारी पक्ष भाजपकडून जनतेची कथित फसवणूक आणि अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत आहे.
कुणावर जास्त विश्वास?
एबीपीने सी व्होटर सर्व्हेने देशवासीयांकडून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचा कोणत्या पक्षावर जास्त विश्वास आहे, हे एबीपीने सी व्होटर सर्वेक्षणात समोर आलं आहे. देशभरातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष जनतेचे कोणता प्रश्न सोडवू शकतो, यावर लोकांची मते जाणून घेतली आहे. या सर्व्हेमध्ये जनतेच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
जनतेची प्रतिक्रिया काय? Lok Sabha Elections।
एबीपी न्यूज सी व्होटरच्या सर्वेक्षणात लोकांनी काँग्रेसपेक्षा भाजपवर अधिक विश्वास व्यक्त केलाय. देशभरातील 32 टक्के लोकांनी समस्या सोडवण्यासाठी भाजपवर विश्वास असल्याचे म्हटले आहे, तर केवळ 17 टक्के लोकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्याच वेळी, या दोन पक्षांऐवजी इतर कोणत्याही पक्षावर विश्वास व्यक्त करणारेही 5 टक्के लोक आढळून आलेत. विशेष म्हणजे 46 टक्के लोकांनी देशातील कोणत्याही पक्षावर अविश्वास व्यक्त केला असून यापैकी कोणताही पक्ष पूर्णपणे समस्या सोडवू शकत नसल्याचं म्हटलंय.