Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून राज्यात एनडीएमधील लढत संपुष्टात येताना दिसत आहे. कारण राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरला असल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये भाजप महाराष्ट्रातील 48 पैकी 32 जागांवर निवडणूक शक्यता वर्तवण्यात येत आहे. उर्वरित जागांपैकी 10 जागा शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात येणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) पदरात दोन ते तीन जागा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
अशात येत्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उमेदवार अर्ज भरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच सकल मराठा समाजाच्या वतीने नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालयात महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयावर चर्चा करुन निर्णय घेत मराठा समाज बांधव निवडणुकीमध्ये हजारो अर्ज भरुणार असल्याचा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
अशात लोकसभा निडवणुकीसाठी मनोज जरांगे पाटील सुद्धा फॉर्म भरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकतात आणि आमचा करेकट कार्यक्रम करा म्हणतात. पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. ते काही माझे करू शकत नाहीत. माझ्या घरावर तुळशीपत्र आहेत. आता मराठे फॉर्म भरत आहेत, त्यांची फजिती होणार आहे आणि टेन्शन येणार आहे. फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही हा समाजाचा निर्णय आहे”, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.
“माझे नियोजन आहे, ओबीसीमधून आरक्षण. आता फोन आला आणि केला तर फक्त आरक्षणावरच बोलायचं. आता मला सरकार सत्तेच्यामधील काटा समजतात आणि याला बाजूला करा म्हणतात.” असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा
‘किंग’ चित्रपटात शाहरुख – सुहाना एकत्र करणार स्क्रीन शेअर