मुंबई : राज्यात अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आले आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. केंद्राकडून आवश्यक ती मदत कोकणाला पुरवण्यात येत आहे. अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
ते म्हणाले,’ कोकणात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे मात्र या स्थितीशी राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. कोकणातील लोकांचा जीव अतिवृष्टीने धोक्यात येतो.
ते पुढे म्हणाले,’मुख्यमंत्र्यांना माणुसकी आहे का? गाडी चालवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. परंतु चेंबूर, विक्रोळीला अतिवृष्टीनं घरं कोसळली, जे मृत पावलेले त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत? राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचा हित करणारा मुख्यमंत्री हवा. ड्रायव्हर शासनाकडे हजारो आहेत. गाडी चालवायची असेल तर कॅबिनेटला जा, मंत्रालयात जाऊन काम करा.अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.