कोल्हापूर (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत साहित्यिकांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्याला साहित्यिकांनी विरोध दर्शवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे , शरद गायकवाड ,राजाभाऊ शिरगुप्पी, आप्पासाहेब खोत, किसनराव कुराडे यांच्यासह 25 हुन अधिक साहित्यिकांनी कृषी कायद्याला विरोध दर्शवला आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्फत पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.