Kejriwal runs the government from jail : दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीची चौकशी सुरूच आहे. सीएम अरविंद केजरीवाल सध्या सहा दिवसांच्या ईडीच्या कोठडीत आहेत आणि 28 मार्चला ईडी त्यांना कोर्टात हजर करणार आहे. म्हणजे यावेळची केजरीवालांची होळी ईडीच्या कोठडीतच होणार आहे.
काहीही झाले तरी मी राजीनामा देणार नाही, तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी आधीच सांगितले होते. त्यांनी जे सांगितले तेच आता होताना दिसत आहे. रविवारी त्यांनी तुरुंगातूनच जलमंत्रालयाबाबत सूचना जारी केल्या असून ही सूचना जलमंत्र्यांना एका पत्राद्वारे देण्यात आली आहे, ज्यामध्ये उन्हाळा आला आहे, त्यामुळे दिल्लीतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असे म्हटले आहे. | Kejriwal runs the government from jail
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या राजीनाम्याची भाजप सातत्याने मागणी करत आहे, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे आणि ते कोठडीतून सरकार चालवत आहेत.अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपल्या अटक आणि कोठडीच्या विरोधात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयाने सांगितले की, आता बुधवारी न्यायालय सुरू होईल तेव्हाच या प्रकरणाची सुनावणी होईल. | Kejriwal runs the government from jail
केजरीवालांच्या जलमंत्र्यांना सूचना
सीएम केजरीवाल यांनी आपल्या सूचनांमध्ये जलमंत्र्यांना लिहिले की, काही भागात पाणी आणि गटारांची समस्या आहे. मी तुरुंगात आहे पण दिल्लीच्या जनतेला त्रास होता कामा नये. योग्य संख्येने टँकरची व्यवस्था करावी. जलमंत्री आतिशी यांनी केजरीवाल यांच्या सूचना वाचून दाखवल्या, ज्यात पाणी टंचाई त्वरित भरून काढा, असेही लिहिले होते. त्यांच्या सूचनांची संपूर्ण प्रतही समोर आली आहे. | Kejriwal runs the government from jail
केजरीवालांच्या सूचनेवर भाजपचा टोला
केजरीवाल यांच्या सूचनेवर भाजप नेते मनोज तिवारी यांनी खरपूस समाचार घेत म्हटले की, 9 वर्षांनंतर केजरीवालांना पाण्याची आठवण झाली आहे. तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल चिंतेत आहेत. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे हाय लागली आहे, ज्याची त्यांना शिक्षा होत आहे. | Kejriwal runs the government from jail