नाशिक – मराठी साहित्य संमेलनात जावेद अख्तर येणार म्हणून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांना बोलवण्यात आलं. तसंच ते काय बोलणार याची उत्सुकता होती. आज नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवत जे भाषण केलं ते सगळ्यांसाठीच महत्त्वाचं होतं.
पटकथाकार गीतकार @Javedakhtarjadu आता इतिहासकारांच्या भूमिकेत आलेत. महाराजांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची असे ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलले… ‘मुजरा’ व्हायचा असे म्हणाले नाहीत हे नशीब. ब्रिगेडी राज्यकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 4, 2021
जावेद अख्तर यांनी साहित्य कला, चित्रकला किंवा कोणत्याही कलेला राजाश्रय मिळतो त्यांना ती आवडत असते असं म्हटलं. मात्र जेव्हा एखादा साहित्यिक, कवी, विचारवंत, शायर हा सामान्य माणसाची दुःखं दाखवतो, वास्तवदर्शी लिखाण करतो, तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारे त्याला आधी वाईट ठरवायचे आता अँटी नॅशनल ठरवून मोकळे होतात असंही म्हटलं आहे.
या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर हे आता इतिहासकारांच्या भूमिकेत आले असल्याची खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत हे नशीब, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.