Manipur Violence Updates : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकरांनी देखील या संपूर्ण घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे आणि रिचा चड्ढा यांनी ट्वीट करत मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले की, “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून हादरलो. मला आशा आहे की दोषींना एवढी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असे भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही.’ तर रिचा चड्ढाने “लज्जास्पद! भयंकर! नियम नसलेले!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Shaken, disgusted to see the video of violence against women in Manipur. I hope the culprits get such a harsh punishment that no one ever thinks of doing a horrifying thing like this again.
— Akshay Kumar (@akshaykumar) July 20, 2023
याशिवाय रेणुका शहाणे यांनीही या प्रकरणावर ट्वीट केले आहे. “मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांचा तो व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणं योग्य आहे का? भारतीय म्हणणं तर सोडून द्या!” अशी संतप्त प्रतिक्रिया रेणुका शहाणे यांनी दिली आहे.
Is there no one to stop the atrocities in Manipur? If you are not shaken to the core by that disturbing video of two women, is it even right to call oneself human, let alone Bharatiya or Indian!
— Renuka Shahane (@renukash) July 19, 2023
“मणिपूरमधील व्हिडीओ पाहून धक्का बसला. मी घाबरले, हादरले आहे. हे मे महिन्यात घडलं आणि त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सत्तेच्या नशेत बसलेले आणि अशा घटनांवरही गप्प बसणारे सेलिब्रिटी पाहून लाज वाटते. प्रिय भारतीयांनो आम्ही येथे कधी पोहोचलो?” असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह या व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले की, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. याप्रकरणी सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
Shocked,shaken,horrified at #manipur video n fact that it’s happened in May with no action on it. Shame on those sitting on their high horses drunk with power,jokers in media boot licking them,celebrities who r silent. When did we reach here dear Bharatiyas/Indians?
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 20, 2023
दुसरीकडे केंद्र सरकारही या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या घटनेला पूर्णपणे अमानवीय ठरवले असून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी याबद्दल बोलले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.