हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – इसापूर हे धरण यवतमाळ,हिंगोली व नांदेड जिल्हयासाठी महत्वाचे आहे.या धरणावर या तीन जिल्हयातील सुमारे १.१० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येते.या धरणावर कळमनुरी शहराचा तसेच २५ गाव मोरवाडी योजनेचा पाणी पुरवठा अवलंबून आहेत.त्यामुळे हे धरण भरल्यास त्याचा फायदा या तीनही जिल्हयांना होतो.मागील काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातचांगला पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक चांगली सुरु आहे.
चालु वर्षात १ जुन पासून आज पर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७३४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.त्यामुळे आज ईसापुर धरणाच्या सांडव्याची दोन वक्रद्वारे सेंटीमीटरने उघडण्यात आली असून सध्या स्थितीत पैनगंगा नदीपात्रात १२९६ क्यूसेक्स ( ३६.६७६ ) ह्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पेन टाकळी व कोराडी प्रकल्प मधून पैनगंगा नदी पात्रात पाणी येत असल्यामुळे जयपुर बंधाऱ्यांमधून १९६६ सेक्सस इतका प्रवाह येत असल्यामुळे येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवला जाऊ शकतो किंवा कमी केला जाऊ शकतो यामुळे नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाने केले आहे.