नवी दिल्ली – भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर याच्यावर यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात सर्वात जास्त बोली लागेल, असा विश्वास माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला आहे.
या मोसमापासून स्पर्धेत दोन नवे संघ दाखल झाले असून अय्यरची गेल्या दोन मोसमांतील कामगिरी पाहता त्याला 20 कोटी रक्कम मिळाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने गेल्या मोसमात त्याच्याकडे नेतृत्व दिले होते. मात्र, त्याला दुखापत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते व त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधारपद सोपवले गेले होते.