मुबंई – आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयने जाहिर केले आहे. यंदाची स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरु होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, देशात यंदा लोकसभा निवडणूका होणार असल्याने स्पर्धेचे निश्चित वेळापत्राक अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही.
लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहिर करण्यात येइल असेही बीसीसीआयने म्हटले आहे. या निवडणूकीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा देशाबाहेर होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र, अद्याप बीसीसीआयने याबाबत मैन बाळगले आहे.
स्पर्धेच्याच दरम्यान जर निवडणूकीच्या तारखा येत असतील व ज्या राज्यांत या सामने व निवडणूक यांच्यात गोंधळ होणार असेल तर त्या राज्यातील क्रिकेट संघटनेचे मत विचारात घेत तेथे सामने आयोजित करायचे किंवा कसे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
निवडणुकीमुळे आयपीएल आयोजनावर परिणाम का होतो?
2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान भारताबरोबरच UAE मध्येही सामने खेळवले गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोनदा आयपीएलचे आयोजन देशाबाहेर का करावं लागले, असा प्रश्नही उपस्थित होतो. यामागे अनेक कारणे आहेत. सर्व प्रथम, ही आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे. अशा स्थितीत संपूर्ण दोन महिने सामन्यांदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागेल. लोकसभा निवडणुकीमुळे या सुरक्षा व्यवस्थेत थोडीशी कपात होण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीच्या काळातही देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. मग निवडणुकीच्या काळात वातावरण बिघडण्याची भीती आहे. निवडणुकीच्या वेळी होणार्या मॅचेसमुळे कायदा व सुव्यवस्थेत मोठे बदल करण्याची गरज असते. त्यामुळेच हे सर्व टाळण्यासाठी आयपीएलचे दोनदा भारताबाहेर आयोजन करावे लागले.
#PKLSeason10 (#JPPvTT Match 67) : जयपुर पिंक पॅंथर्सचा तेलगु टायटन्सवर थरारक विजय..
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतात आयपीएल झाली. त्यावेळी निवडणुका आणि सामन्यांच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगला समतोल राखण्यात आलेला दिसून आले होते. मतदानाचा टप्पा लक्षात घेऊन सामन्यांच्या तारखाही ठरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाही निवडणुकांसोबतच भारतात एकाच वेळी आयपीएलचे आयोजन होण्याची शक्यता आहे.