पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असल्या प्रकरणात निगडी येथील औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व नऊ संस्थाचालकांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. तपास अधिकारी बोलावतील, त्यावेळी निगडी पोलीस स्टेशनला हजर राहणे आणि तपासास सहकार्य करण्याचा अटीवर जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे.भरूका यांनी हा आदेश दिला आहे.
मधुकर पचपांडे, सुशिल पाटील, शिवाजी जगताप, गोविंद काळे पाटील, विमल पाटील, सुरेश बडगे, कौतिक जांगळे, किरण देसाई आणि वसंत पठारे अशी नऊ जणांनी नावे आहेत. त्यांनी ऍड. मंगेश ऊर्फ दादासाहेब धुमाळ यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सर्व आरोपींवर
महाराष्ट्र ठेवीदारांचे ( वित्तीय संस्थांमधील ) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कायद्या अंतर्गत दाखल गुन्हा दाखल आहे. 2016 मध्ये वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवीचे मुदत संपूनही देखील व्याज आणि ठेवी परत न दिल्याचा आरोपा आहे.
तसेच, संस्था बुडीत निघाल्याने संस्था व संस्था चालकांच्या विरोधात निगडी व पिंपरी येथे अन्य गुन्हे दाखल होते. 2016 चा असलेला गुन्हा, त्यामध्ये बहुतांश संस्थाचालक ज्येष्ठ नागरिक असल्याने आणि अन्य योग्य कायदेशीर बाबी तपासून न्यायालयाने हा निकला दिला आहे.