बारामती(डोर्लेवाडी) – बारामतीत झालेल्या ऊसदरवाढी संदर्भातील आंदोलनामध्ये गुन्हा दाखल झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यासह 27 जणांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
तब्बल आठ वर्षांनी या न्यायालयाचा निकाल लागला आहे. निकाल काय लागेल याची उत्सुकता लागून राहिली होती मात्र, आज बारामतीच्या न्यायालयाने आज सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
यामुळे शेतकरी आंदोलन कर्त्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. बारामतीत झालेल्या आंदोलनात ऊस गाड्यांचे टायर फोडणे, ट्रॅक्टर चे टायर फोडणे ऊस वाहतूकदारांचे नुकसान करणे आदी गुन्हे दाखल होते.