नवी दिल्ली, – दिल्लीच्या सीमांवर धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी सरकारने तेथे सिमेंट क्रॉंकिटचे पक्के अडथळे उभारले आहेत. त्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारने भिंती नव्हेत तर पुल बांधण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.
दिल्ली आणि गाझीपुर सीमा तसेच दिल्ली आणि हरियाना सीमेवर सरकारने हे अडथळे उभारले आहेत त्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ही टिपण्णी केली. सरकारने या भागात तारांचे कुंपण तसेच मोठमोठे बॅरिकेट उभे करून आंदोलकांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी तसेच राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात आता राहुल गांधी यांनीही यानिमीत्ताने उडी घेतली आहे.