कंपन्यांच्या प्रशासनाला रांजणगाव सरपंचांनी केले आवाहन
रांजणगाव गणपती -परदेशातून आलेल्या कामगारांची माहिती कंपनी प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला व आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन कारेगावचे सरपंच अनिल नवले यांनी केले आहे. या संदर्भात शिरूरचे तहसीलदार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, रांजणगाव औद्योगिक विभागीय कार्यालय व सर्व कंपन्यांना पत्रव्यवहार केला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारेगाव ग्रामपंचायत व तालुका वैद्यकीय विभाग व कारेगाव डॉक्टर असोसिएशनची संयुक्त बैठक केली होती. यावेळी उपसरपंच राजेंद्र नवले, ग्रामपंचायत सदस्य गणेश ताठे, तालुका आरोग्य सहायक सुरेश लवांडे, ग्रामसेवक एस. बी. भाकरे, आरोग्य सेविका एस. बी. राऊत, आरोग्य सेवक डी. पी. कोकडे, डॉ. अभय पडवळ, डॉ. रणधीर डफळ, डॉ. अजित लांडे उपस्थित होते.
कंपन्यांनी शक्य असल्यास 31 मार्चपर्यंत कामकाज बंद ठेवावे किंवा ठराविक कामगारांमध्ये कामाचे व्यवस्थापन करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती करावी. 1 मार्चपासून परदेशातून कंपनीत आलेल्या अधिकारी व कामानिमित्त आलेल्या परदेशी नागरिकांची कंपनीने माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन सुरेश लवांडे यांनी
केले आहे.