मुंबई – साम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी ज्योतिर्लिंग वादावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे तिथं तुमची सर्व सोय.. बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आला नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशातच आता अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट…
भीमाशंकर (आसाम) नंतर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग अशा प्रकारे पळवण्यात येऊ शकतात. परळी वैजनाथ (गुजरात) घृष्णेश्वर (उत्तर प्रदेश) औंढा नागनाथ (गोवा) त्रंबकेश्वर (जम्मु काश्मीर)… उद्योग केले देवही गेले .#हरघरमोदीमहादेव
भीमाशंकर (आसाम) नंतर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग अशा प्रकारे पळवण्यात येऊ शकतात. परळी वैजनाथ (गुजरात) घृष्णेश्वर (उत्तर प्रदेश) औंढा नागनाथ (गोवा) त्रंबकेश्वर (जम्मु काश्मीर)… उद्योग केले देवही गेले .#हरघरमोदीमहादेव
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 15, 2023