मुंबई – आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी यांच्यावर आरोप केले आहे. इतकेच नाही तर राजकारणाविरुद्ध सर्व भारत एकत्र येईल, व लवकरच ही हुकूमशाही उलथवून टाकेल, तो दिवस दूर नसल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आदित्य म्हणाले की, “आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी सारे भारतीय एकत्र आले आणि “चले जाव’ चा नारा भारतभर घुमला. ह्या लढ्याने भारताचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले.
आज पुन्हा एकदा “चले जाव’ चा नारा देऊया… हुकूमशाही राजवटीविरुद्ध, खोक्यांच्या राजकारणाविरुद्ध! आता तो दिवस दूर नाही, जेव्हा सारा भारत एकत्र येईल आणि ही हुकूमशाही उलथवून देईल! इंडियाही विजयी होईल!’