अहमदाबाद – भारत विरूध्द इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेस आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचरण केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. शिखर धवन 4, लोकेश राहुल 1 आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने 21(23), श्रेयस अय्यरने 67(48) आणि हार्दिक पंड्याने 19(21) धावा करत भारतीय संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुंदरने नाबाद 3 आणि अक्षर पटेलने नाबाद 7 धावा करत भारतीय संघाची धावसंख्या 20 षटकांत 7 बाद 124 वर नेली.
इंग्लंडक़डून जोफ्रा आर्चरने 4 षटकांत 23 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.