मुंबई – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांनी यावेळी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुरावेदेखील सादर केले. त्यांच्या ‘व्हिडिओ बॉम्ब’नंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हिताचा लाव रे तो व्हिडिओ काय असतो हे दाखवून दिले आहे, तसेच फडणवीस यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने वाढ करावी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांना कोण भेटतं, यावर लक्ष ठेवलं पाहिजे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.