नवी दिल्ली – एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक भारताने नोंदविला आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 चे 68,584 रूग्ण बरे झाले असून यामुळे, कोविड -19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा 21.5 लाखांनी जास्त झाली आहे.
आजमितीस बरे झालेले रूग्ण सक्रिय रूग्णांपेक्षा 3.6 पटीहून अधिक वाढले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाने विक्रमी पातळी गाठल्याने सक्रीय रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि सध्या केवळ 21.16 टक्केच सक्रिय आहेत.
देशातील कोविडने होणारा मृत्युदर 3.3 टक्क्यांच्या जागतिक सरासरीच्या खाली राखला गेला आहे. या मृत्युदरात दररोज घट होत असून तो आज 1.75 टक्क्यांवर आहे.