जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या प्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. या आरोपांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे.
चित्रा वाघ यांचे ट्विट
ओ मोठ्ठ्या ताई @supriya_sule
मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहीला असता.
मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट… https://t.co/HcouCtFBmo— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 2, 2023