कोलकाता :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नवरात्रीच्या कालावधीत कोलकाता येथे होत असलेल्या सामन्यांबाबतही आता संभ्रम निर्माण होत चालला आहे.
नवरात्रीत येथिल कालीमातेच्या पूजेचा सोहळा खूप मोठ्या स्तरावर होत असतो व त्यामुळे पोलीस तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांवर ताण असतो. त्यातच आता विश्वकरंडकाचे सामने येथे होत असल्याने अतीरीक्त ताण या यंत्रणांवर येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या तारखा पाहून त्यानुसार सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करता येतील का, अशी मागणी बंगाल क्रिकेट संघटनेने केली आहे.
त्यातच कोलकाता पोलिसांनी 12 नोव्हेंबरला होत असलेल्या पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील सामन्याला सुरक्षा पुरवण्यास नकार दिला असून त्यामुळेच संघटनेने ही मागणी केली आहे.