Devendra fadnavis : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल.
प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे. सध्या संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, अश्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अजब विधान केलं आहे. ‘हे रामाचं मंदिर अयोध्येत वादग्रस्त जागेवर बांधण्यात आलं नसून तिथून पुढे असलेल्या चार किमी अंतरावर बांधण्यात आलं आहे’. असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.
यावेळी बोलणं संजय राऊत म्हणाले की, “मंदिर वही बनाएंगे, असा भाजपाचा नारा होता. पण तुम्ही तिथं जाऊन पाहा मंदिर बनवलं आहे की नाही. जिथे मंदिर बनवण्याच्या चर्चा सुरू होत्या, तिथं मंदिर बनवलेलं नाही. तिथून चार किमीवर मंदिर बांधण्यात आलं आहे. ते कोणीही बांधलं असतं. पण त्यावर आम्हाला चर्चा करायची नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे. यावर भाजपान बोलायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, याचसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. “मंदिर वही बनाऐंगे असा भाजपा नारा होता मात्र ठरलेल्या जागेपासून 4 किलोमीटरवर राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. याकडे आपण कसं पाहता?” असा प्रश्न फडणवीस यांना एका पत्रकाराने विचारला.
त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “ज्यांचं या आंदोलनात काहीही योगदान नाही असे लोक अशाप्रकारेचे आरोप करुन स्वत:चं हसं करुन घेत आहेत आणि कोट्यवधी हिंदूचा अपमान करत आहेत. आता तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अशाप्रकारे हिंदूंचा अपमान करणं बंद करावं. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की, मी मुर्खांना उत्तरं देत नाही. मात्र मी इतकं सांगेन की देशातील हिंदूंचा अपमान बंद करा. तुमचं रामजन्मभूमी आंदोलनात कोणतेही योगदान नाही.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.