Devendra Fadnavis| देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या वक्तव्याविषयी भाष्य केले आहे. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं, त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत सभा घेत असताना काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचे आज प्रकाशन राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उध्दव जी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे हीत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो.”
यावेळी देवेंद्र फडणवीस काँग्रेसवर देखील टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसते तर दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टचार झाला नसता. राज्यात 30 ते 40 वर्षापूर्वी एका घराण्यापुरते राजकारण असायचं. आधी काही बाहुबली होते. पण आता ते बदलले आहे. देश कदाचित आताच विकसित झालेला असता. सांस्कृतिक दृष्ट्या देश पुढे असला असता. 370 सारख्या चुका झाल्याचं नसत्या, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “अब की बार 400 पारच्या घोषणे मागे पंतप्रधानांच्या भावना समजून घेतल्या पाहीजेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेतले. परंतू राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक केवळ यासाठी केला की, जगाला कळावं की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी, हा विश्वास आहे यात अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
भविष्यात परिवारवाद नसेल Devendra Fadnavis|
सक्षम व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणे म्हणजेच परिवाद आहे. कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खरगे स्वत: काही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय राहुल गांधीच घेतात हे लोकांना माहीती आहे. शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी केला. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादामुळेच हे सगळे झाले.
गुंडांशिवाय राजकारण होतं हे मोदींनी दाखविले Devendra Fadnavis|
सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता असे राजकारण आतापर्यंत सुरु होते, सुरुवातीच्या काळातील राजकारण पाहीले तर 30 कुटुंबांभोवती देशातील राजकारण फिरत होते. बाहुबली, गुन्हेगारांची गरज भासू लागली. मग सर्वांचा राजकारणात प्रवेश सुरु झाला. परंतू 2014 नंतर पंतप्रधानांनी देश आणि महाराष्ट्रातील चित्र बदलले. ही व्यवस्था तोडण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गुंडांशिवाय राजकारण होऊ शकतं हे दहा वर्षांत मोदीजींनी दाखविले आहे, 100 टक्के यश मिळालेले नाही. पण काम सुरु आहे.
विरोधक हवेच Devendra Fadnavis|
इंडिया आघाडीत सर्व इंजिन्स असून एकही बोगी नाही. विरोधक असलेच पाहीजेत. आम्ही विरोधी पक्षात होतो. आम्ही असताना आणि आताच्या विरोधी पक्षात फरक आहे. सुप्रीम कोर्ट यांच्या बाजूने निर्णय देतात तेव्हा ते न्यायालयाचे गुणगाण गातात आणि विरोधात निर्णय आला की शिव्या देतात असे विरोधकांचे काम आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा:
आता प्रत्येक शाळेत निनादणार “जय जय महाराष्ट्र माझा…”; राज्य सरकारने काढले आदेश