जळोची : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना हरवायचे आहे. महाराष्ट्रच नुकसान कुणी केलं तर पवार साहेबांनी केलं असल्याची टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. बारामती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवलं तर ते पवारांनी ठेवलं. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव एवढं एकच ध्येय आहे.
चंद्रकांत पाटील यांनी थेट बारामतीत येऊन शरद पवार यांना चॅलेंज दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लोकसभेची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. भाजपचे दिग्गज नेते बारामतीत लक्ष घालू लागले आहेत. थेट शरद पवार यांना आव्हान देऊ लागले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीच्या पैलवाणाला थेट आखाड्यात येऊन चॅलेंज देण्याचे काम सुरू आहे